संयुक्त महाराष्ट्र साकार होऊन ६० वर्षे होत अाली, तरी राज्यात पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही, अनेक सरकारं आली आणि गेली, तरी पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये सिंचनावर खर्च केलेला पैसा गेला कुठं? असा खाेचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांसमोर रविवारी तुफान फटकेबाजी केली.
यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार इ. उपस्थित होते.
कार्यक्रमात अजित पवार यांनी काही लोक केवळ बोलघेवडे असतात, बोलून निघून जातात, असं म्हणत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कुरघोड्यांमुळेच सिंचनाचं काम नीट झालं नाही, गावखेड्यांचा विकास झाला नाही, असं म्हणत राज यांना प्रतिटोला हाणला.
हेही वाचा-
राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत?
मग आरक्षणाचा काय उपयोग? - राज ठाकरे