नाणार प्रकल्प जाहीर होण्याआधी तिथं परप्रांतीय गुजराती, मारवाडी लोकांनी जमिनी विकत कशा घेतल्या? हा संशोधनाचा विषय आहे. या साऱ्या प्रकल्पाची चौकशी व्हायला हवी. सद्यस्थितीत चौकशी करूनही न्याय मिळत नाही, हे लोया प्रकरणाचं काय झालं? त्यावरून दिसतंच आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रकरणाच्या मूळाशी जायला हवं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नोंदवली.
हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातमध्ये नेऊ, असं केंद्र सरकार म्हणतं, मग त्यांना देशातलं दुसरं राज्य दिसत नाही का? राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार सांग काम्या सरकार आहे. केंद्रातून जे सांगितलं जाईल, तेवढंच काम ते करतात. केंद्राविरूद्ध ब्र काढायचीही त्यांची हिम्मत होत नाही, अशी टिकाही राज यांनी केली.
हेही वाचा-
'नाणार' होऊ नाय देणार! मनसेनं फोडलं ताडदेवमधलं प्रकल्पाचं कार्यालय
मनसेच म्हणतेय, फेरीवाल्यांचे लवकर पुनर्वसन करा!