मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत आहेत. पण दुर्देवाने आपल्या देशात अशा काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे या एकोप्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांचं मन साफ नाही म्हणून ते असे प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी इफ्तार दावतचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीही सीएसएमटीजवळील हज हाऊस इथं इफ्तार दावतचं बुधवारी रात्री आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
कटुता आणण्याचा प्रयत्न
मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत आहेत. पण दुर्देवाने आपल्या देशात अशा काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे या एकोप्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
भावनांशी खेळण्याचा प्रयत्न
मी वर्तमानपत्रात वाचलं की, काही प्रतिगामी शक्ती इफ्तार दावतचं आयोजन करत आहेत. नागपूरात एक संस्था आहे, ज्यांनी यावर्षी रोजा इफ्तार दावतचं आयोजन केलं होतं. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही शरद पवार म्हणाले.
जनतेवर बंधने
आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार आणि काय घालणार? हे ठरवलं जात आहे. ही गोष्ट योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचं नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीने नेहमीच अल्पसंख्यांक समाजाचा विचार केला. मात्र अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. या इफ्तार पार्टीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी आदी उपस्थित होते.
जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांचं मन साफ नाही म्हणून ते असे प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी इफ्तार दावतचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीही सीएसएमटीजवळील हज हाऊस इथं इफ्तार दावतचं बुधवारी रात्री आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
कटुता आणण्याचा प्रयत्न
मागील अनेक वर्षांपासून आम्ही ही दावत आयोजित करत आहोत. या दावतला हजर राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत आहेत. पण दुर्देवाने आपल्या देशात अशा काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे या एकोप्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
भावनांशी खेळण्याचा प्रयत्न
मी वर्तमानपत्रात वाचलं की, काही प्रतिगामी शक्ती इफ्तार दावतचं आयोजन करत आहेत. नागपूरात एक संस्था आहे, ज्यांनी यावर्षी रोजा इफ्तार दावतचं आयोजन केलं होतं. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही शरद पवार म्हणाले.
जनतेवर बंधने
आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार आणि काय घालणार? हे ठरवलं जात आहे. ही गोष्ट योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचं नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीने नेहमीच अल्पसंख्यांक समाजाचा विचार केला. मात्र अल्पसंख्यांक समाजाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. या इफ्तार पार्टीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी आदी उपस्थित होते.
हेही वाचा-
शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत
अमित शहा व्यंगचित्रातून राज ठाकरेंकडून टार्गेट