महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे अंतिम निकाल हाती येण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक उरलेला असताना राज्यात भाजपच एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढंच नाही, तर महाविकास आघाडीविरोधात लोकांच्या मनात तीव्र नापसंती असल्यानेच हे तिघे पक्ष एकत्र येऊनही मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितलं की, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्याच ठिकाणी जनतेने भाजपला भरभरून समर्थन दिलं आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवून देखील भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांच्या मनात किती रोष आहे, हेच दिसून येत आहे.
हेही वाचा- ग्रामसभा पूर्ववत करण्यास मंजुरी- हसन मुश्रीफ
हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच ठरली अव्वल