मुसळधार पावसामुळे एकिकडे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात तसंच घरांमध्ये पाणी भरल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसामुळे सोमवारी मध्यरात्री मालाडमध्ये भिंत कोसळून अनेकांचा मृ्त्यू झाला. तर मंगळवारी सकाळी कल्याणमध्ये उर्दु शाळेची भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. मालाडमध्ये देखील पाण्यात अडकलेल्या कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. एकप्रकारे मुंबईवर आसमानी संकटच कोसळलं आहे.
मुंबईत अशी परिस्थिती असतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कविता सुचली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीटरवर पावसावर एक कविता लिहली आहे. पण त्यांची कविता नागरिकांच्या पसंतीस काही उतरलेली नाही. कवितेवर नेटकरांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
कुछ तो चाहत रही होगी
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2019
इन बारिश की बूँदों की भी,🌨
वर्ना कौन गिरता है इस जमीन पर
आसमान तक पहुँचने के बाद !
एकिकडे मुंबईची तुंबई झाली आहे.
लोकांचा जीव चाललाय आणि त्यात तुम्हाला अशा कविता कशा काय सुचू शकतात?
असा प्रश्न नेटकरांनी उपस्थित केला आहे.
तर काहींनी या ट्वीटवरून त्यांना ट्रोल केलं आहे. सकाळचा नाष्टा जावेद अख्तर यांच्यासोबत केला का? असा खोचक प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय.
Shameless comment@republic @Zeenews @aajtak @indiatvnews @Dev_Fadnavis @AmitShah @narendramodi
— Nilay Mehta (@nilay2cool) July 2, 2019
Javed Akhtar ke sath breakfast kiya aaj
— 🇮🇳 Sukumar Nadar 🇮🇳 (@nadar_sukumar) July 2, 2019
Are u serious 🙄 Yaha logo ki maut ho rahi he ..
— 𝓡𝓾𝓭𝓻𝓪 (@sunnysnaman) July 2, 2019
जेव्हा रोम जळत होते,
— Pratapsinh Patil (@gpekmaratha) July 2, 2019
निरो पावा वाजवत होता...
जनाची नाही, मनाची तरी शिल्लक असेल तर मुंबईचे आजचे हाल बघून जबाबदारीने वागा.
27 लोगो की मौत पर शर्मनाक शायरी
— बेरोजगार shaad khan (@shaadchp) July 2, 2019
हेही वाचा