मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मंत्रालयासमोरील रस्ता खोदला. याची माहिती मिळताच मरीनड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांवर शासकिय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार पावसात उखडलेले पेव्हरब्लॉक आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मंत्रालयासमोरील रस्ता खोदला. याची माहिती मिळताच मरीनड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांवर शासकिय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरीही सरकार गप्प
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यामुळे राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र सरकारकडून खड्डे मुक्त रस्त्याबाबत कोणतीही भूमिका घेतली जात नाही. यावर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेनं सोमवारी रात्री अचानक मंत्रालयासमोरील रस्ता खोदला.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी घाव
सोमवारी रात्री मनसेचे २० हून अधिक कार्यकर्ते दुचाकी आणि कारमधून मंत्रालयासमोर उतरले. त्यावेळी त्यांच्या हातात फावडे आणि कुदळ होती. मंत्रालयाबाहेर गस्तीवर असलेले पोलीस त्यांच्याजवळ येणार त्यापूर्वीच आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी फूटपाथ आणि मंत्रालयासमोरील रस्ता उखडण्यास सुरुवात करत सरकारचा निषेध केला. याबाबतची माहिती मिळताच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली.
पोलिसांची गाडी येताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी पळ काढला. तर आठ मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या सर्वांवार शासकिय मालमत्तेची नासधूस करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचं पालन न केल्याप्ररकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मुंबईत मुसळधार पावसात उखडलेले पेव्हरब्लॉक आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मंत्रालयासमोरील रस्ता खोदला. याची माहिती मिळताच मरीनड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांवर शासकिय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरीही सरकार गप्प
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यामुळे राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र सरकारकडून खड्डे मुक्त रस्त्याबाबत कोणतीही भूमिका घेतली जात नाही. यावर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेनं सोमवारी रात्री अचानक मंत्रालयासमोरील रस्ता खोदला.
पोलिसांनी घेतली घटनास्थळी घाव
सोमवारी रात्री मनसेचे २० हून अधिक कार्यकर्ते दुचाकी आणि कारमधून मंत्रालयासमोर उतरले. त्यावेळी त्यांच्या हातात फावडे आणि कुदळ होती. मंत्रालयाबाहेर गस्तीवर असलेले पोलीस त्यांच्याजवळ येणार त्यापूर्वीच आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी फूटपाथ आणि मंत्रालयासमोरील रस्ता उखडण्यास सुरुवात करत सरकारचा निषेध केला. याबाबतची माहिती मिळताच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली.
पोलिसांची गाडी येताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी पळ काढला. तर आठ मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या सर्वांवार शासकिय मालमत्तेची नासधूस करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचं पालन न केल्याप्ररकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -
म्हणून मनसेनं मंत्रालयासमोरील फुटपाथ खोदला
तर, अधिकाऱ्यांना झोडपून काढू- संदीप देशपांडे