Advertisement

सत्तेचं टाॅनिक संपल्याने भाजपची ‘सूज’ उतरली, सामनातून भाजपवर टीका

भाजपला टोला लगावताना बाळसं म्हणून दिसणारी भाजपची सूज उरल्याची टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

सत्तेचं टाॅनिक संपल्याने भाजपची ‘सूज’ उतरली, सामनातून भाजपवर टीका
SHARES

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपवर मात करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी सत्ता मिळवली आहे. यावरून भाजपला टोला लगावताना बाळसं म्हणून दिसणारी भाजपची सूज उरल्याची टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. नागपूरमध्ये फडणवीस जिथे जिथे प्रचाराला गेले तिथं पक्षाचा पराभव झाल्याचा म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.     

काय आहे अग्रलेखात?

जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’ उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी ६ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. 

हेही वाचा- राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी, तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी दिसत आहे. पण धुळे वगळता भाजप कुठेच नाही. सगळ्यात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली.

नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात ५८ पैकी ४० जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे.

हेही वाचा- गुपचूप काही केलं तर वाईटच घडतं, ‘राज’भेटीवरून नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा