Advertisement

...तर सरकारवरही गोळ्या झाडायच्या का - संजय राऊत

मागील ४ वर्षांमध्ये राज्यात अनेक शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या अाहेत, मग सरकारवरही गोळी झाडायची का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला अाहे.

...तर सरकारवरही गोळ्या झाडायच्या का - संजय राऊत
SHARES

अवनी वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याने सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत अाहेत. या प्रकरणी वनखात्यावर संताप व्यक्त होत अाहे. अाता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर टीका केली अाहे. मागील ४ वर्षांमध्ये राज्यात अनेक शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या अाहेत, मग सरकारवरही गोळी झाडायची का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला अाहे. 


हैदराबादहून शूटर 

यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीला गोळ्या घालून मारण्यात अालं. वाघिणीला मारण्यासाठी हैदराबादहून शूटर मागविण्यात आले होते. राज्यात अनेक एन्काऊंटर झाले अाहेत. मात्र, यातील बरेच एन्काऊंटर खोटे होते असा अारोप करून वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आलं असतं. मात्र, वनमंत्र्यांनी ते मनावर घेतलं नाही, असं राऊत म्हणाले. 


मनेका गांधींचे अाभार

भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीच्या हत्येप्रकरणी अावाज उठवला अाहे. याबाबत मी त्यांचे अाभार मानतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. तसंच शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय अामच्यासाठी जिव्हाळ्याचा अाहे, असंही राऊत यांनी म्हटलं अाहे. 



हेही वाचा - 

मनसेकडून दिपोत्सवादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन

आव्हाड पुन्हा एकदा मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तासभर चर्चा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा