केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवण्यात येत आहेत, तरी कमी लस मिळत असल्याची राज्य सरकारची कुरकूर सुरूच असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली.
भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी पालघरमधून सुरुवात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या. केंद्रातील भाजप सरकारने आपल्या मागील काही दिवसांमध्ये कुठकुठले जनहिताचे निर्णय घेतले आहेत, लोकांच्या सुविधेसाठी कोणकोणते प्रकल्प राबवण्यात येत आहेत, याविषयी लोकांना अवगत करून देण्यासाठीच आम्ही ही जनआशीर्वाद यात्रा काढत आहोत. सोबतच या यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी देखील दाखवून देणार आहोत. राज्यातील कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करून अधिक गर्दी होऊ न देता ही यात्रा करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा- शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्या एकाला अटक
हेही वाचा- डेल्टा प्लसचा मुंबईत पहिला बळी, महिलेचा मृत्यू