मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही.@mybmc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 3, 2020
मुंबईकरांना पाणी कमी पडणार नसल्याने कोरोनाच्या या संकाटाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही. मुंबईची लोकसंख्या अधिक असल्याने मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.