Advertisement

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

सोमवारी म्हणजेच उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी कुठल्या सेवा सुरू आणि कशावर बंदी असेल हे जाणून घ्या.

महाराष्ट्र बंद! जाणून घ्या काय सुरू, काय बंद?
SHARES

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथल्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षानं ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक दिली आहे. राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेची (Shiv sena)  सत्ता असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीनं (MVA) ही बंदची हाक दिली आहे.

महाविकास आघाडीनं सांगितलं की, राज्य देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सांगितलं की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथल्या शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये पूर्ण शक्तीनं सहभागी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात लोकांना जागृत करणं आवश्यक आहे. शेतकरी या लढ्यात एकटे नाहीत आणि त्यांच्यासोबत एकता दाखवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रापासून सुरू झाली पाहिजे.

नवाब मलिक म्हणाले, आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी एकत्र यावे. आपण आपले काम एका दिवसासाठी थांबवले पाहिजे. दुकानदारांनी स्वतः दुकाने बंद ठेवावीत. तीनही पक्षांचे कामगार दुकाने, आस्थापने आणि लोकांना शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्याची विनंती करतील.”

मलिक पुढे म्हणाले की, रविवारी मध्यरात्रीपासून बंदची अंमलबजावणी केली जाईल. ते म्हणाले, "आम्ही सर्व कामगारांना आवाहन करतो की बंद दरम्यान हॉस्पिटल, रुग्णवाहिका, वैद्यकीय कथा, दूध पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी कोणतीही समस्या निर्माण करू नयेत."

व्यापारी संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड व्यापारी संघटनेनं सोमवारी सर्व फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद राहतील असे जाहीर केले आहे. व्यापारी संघटनेनंही सर्व सदस्यांना सोमवारी आपला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन सोमवारी बाजारात आणू नये असं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र बंदच्या निर्णयाचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्ताधारी पक्ष लखीमपूर खेरी घटनेचे राजकारण करत आहे. विशेष म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीमध्ये ४ शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेला.

बंदमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही विस्कळीत  राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद राहण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.



हेही वाचा

११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक, 'हे' आहे कारण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा