शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीवरून सध्या त्यांनी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलंय. पण आपल्या एका ट्विटवरून आदित्य यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागतोय.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या तारखा जाहीर होताच आदित्य यांनी “हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची ” असं ट्विट केलं. या ट्विटवरून आदित्य यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.
Maharashtra elections have been called for! The festival of democracy and the right to choose your own government, your own destiny is now!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 21, 2019
“हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची”
आधी खड्डे भरा, किंवा हॅलिकाॅप्टरने मत मागायला या, असं म्हणत आदित्य यांना सुचवलं आहे. तर एका नेटकऱ्याने आधी आमचं कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करा मग नवीन महाराष्ट्र घडवायंच बघा.. असा खोचक सल्ला दिला आहे.
आधी आमचं कल्याण-डोंबिवली खड्डेमुक्त करा मग नवीन महाराष्ट्र घडवायच बघा..
— किरण बोडके (@MarathiKiranb02) September 21, 2019
New maharastra... Really? pic.twitter.com/aoi7mQs3Lj
— Samir Paleja (@samirpaleja) September 21, 2019
First Repair the potholes ..
— immotional mohit (@coolpacific784) September 21, 2019
Or else come by Helicopter to ask for Vote
Aditya ji pls give us assurance we will get our new Maharashtra and not what we honest tax payers are getting ryt now!!! Maodiji cannot go on micro level.. Its state govt responsibility!!@Dev_Fadnavis pic.twitter.com/ZKJkqUYMgE
— ॐ (@oahindalekar) September 21, 2019
मेट्रो ३ साठी आरे काॅलनीत कारशेड उभारण्यावरून आदित्य यांनी भाजपला चांगलाच धारेवर धरलं आहे. कारशेड उभारण्याकरीता होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे इथली जीवसृष्टी नष्ट होईल, असं म्हणत आदित्य यांनी या विषयाला चांगलीच हवा दिली आहे.
हेही वाचा-
‘इथं’ नोंदवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी, महापालिकेने आणलं ‘हे’ अॅप
मुंबईतील खड्डेही महागडे! एक खड्डा बुजवण्यासाठी २ लाख ३ हजार ९६६ रुपये खर्च