याबाबतच्या सूचना रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सधारकांना देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. हा नियम मोडताना एखादा स्टॉलधारक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रेल्वे स्टॉल्सवर प्लास्टिकमधून विकल्या जाणाया खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही लागू करण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेने घेतला असून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे.
नियम तोडणाऱ्यावर कठोर कारवाई
याबाबतच्या सूचना रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सधारकांना देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. हा नियम मोडताना एखादा स्टॉलधारक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या सूचनेनंतरही स्टॉल्सवर प्लास्टिकच्या पॅकिंगमधील खाद्यपदार्थ दिसून येत आहेत.
रुळांवर पाणी
प्लास्टिकमुळे पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रुळांवर साचत असलेल्या पाण्याला प्रमुख कारण हे प्लास्टिकच असल्याचं रेल्वे प्रशासन सांगते. प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा झाल्यामुळे पाणी साचतं. परिणामी मे २०१२ मध्ये मध्य रेल्वेने प्लास्टिकमधून विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या २५ खाद्यपदार्थावरही बंदी आणली.
स्टाॅलधारकांचा विरोध
पण, स्टॉलधारकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यानी विरोध दर्शवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनंतर रेल्वेत प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.
यासंदर्भात पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्टॉलधारकांना काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्टॉलवर काही खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ प्लास्टिकमधूनही दिले जातात. यामध्ये प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक पिशवीचा समावेश असल्याचं यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रेल्वे स्टॉल्सवर प्लास्टिकमधून विकल्या जाणाया खाद्यपदार्थ आणि वस्तूंवरही लागू करण्याचा निर्णय पश्चिम आणि मध्य रेल्वेने घेतला असून त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे.
नियम तोडणाऱ्यावर कठोर कारवाई
याबाबतच्या सूचना रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सधारकांना देण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. हा नियम मोडताना एखादा स्टॉलधारक आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या सूचनेनंतरही स्टॉल्सवर प्लास्टिकच्या पॅकिंगमधील खाद्यपदार्थ दिसून येत आहेत.
रुळांवर पाणी
प्लास्टिकमुळे पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रुळांवर साचत असलेल्या पाण्याला प्रमुख कारण हे प्लास्टिकच असल्याचं रेल्वे प्रशासन सांगते. प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा झाल्यामुळे पाणी साचतं. परिणामी मे २०१२ मध्ये मध्य रेल्वेने प्लास्टिकमधून विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या २५ खाद्यपदार्थावरही बंदी आणली.
स्टाॅलधारकांचा विरोध
पण, स्टॉलधारकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यानी विरोध दर्शवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनंतर रेल्वेत प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.
यासंदर्भात पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्टॉलधारकांना काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्टॉलवर काही खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ प्लास्टिकमधूनही दिले जातात. यामध्ये प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक पिशवीचा समावेश असल्याचं यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-
मुंबईकरांनो, घरातील प्लास्टिक बाहेर फेकायची करा तयारी!
प्लास्टिक बंदीचा दिव्याखाली अंधार.!