Advertisement

बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय

बोरिवली स्थानक हे गर्दीचे स्थानक आहे.

बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय
SHARES

बोरिवली रेल्वे स्थानक हे मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते. या स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एप्रिल-मेपासून बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे पश्चिम रेल्वेच्या इतर स्थानकांवर वळवले जातील. 

सध्या गुजरात आणि दिल्लीला जाणाऱ्या किमान पाच ते सहा गाड्या आहेत ज्या मुंबई सेंट्रल स्टेशन किंवा वांद्रे टर्मिनसवरून सुरू झाल्यानंतर बोरिवली स्थानकावर थांबतात. रेल्वे आता या गाड्यांना दादर, अंधेरी, बोरिवली, वसई आणि/किंवा बोईसर किंवा पालघर या स्थानकांवर थांबवण्याचा विचार करत आहे.

प्रायोगिक तत्त्वावर निवडलेल्या गाड्यांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे, ज्यामध्ये बोरिवलीऐवजी या गाड्या इतर स्थानकांवर थांबवता येतील. त्यामुळे बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होऊ शकेल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. बोरिवली स्थानकावरून सुमारे ७५ ते ८०% प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढतात आणि उतरतात.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेकडून 'या' ट्रेन्सच्या वेळेत बदल जाहीर

mumbai"="" target="_blank">Mumbai Metro : बीकेसी ते सीप्झ मेट्रो 3 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होऊ शकते">Mumbai Metro : बीकेसी ते सीप्झ मेट्रो 3 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होऊ शकते

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा