देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने सुरू आहे. देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. कोरोनाला अटकाव करणं हे मोठं आव्हान सध्या सर्व राज्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काही घेषणा केल्या. यानुसार आता आयकर परतावा भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत सितारामन म्हणाल्या की, आयकर परतावाबाबत ‘विवाद ये विश्वास’ या योजना तयार करण्यात आली असून त्याची मुदत ३० जूनपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, नोटीस, अपिल, रिटर्न फायलिंग ३० जून पर्यंत करता येणार आहे. तसंच आर्थिक वर्ष २०१८-१९ ज्यांनी रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता ३१ मार्चऐवजी ३० जून २०२० पर्यंत रिटर्न फाइल करता येईल. याशिवाय उशीरा रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी दंड १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय मार्च, एप्रिल, मे महिन्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतही वाढवून 30 जून करण्यात आली आहे.
इतर घोषणा
हेही वाचा -