तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क
मुंबई शहर
ठाणे / पालघर
रत्नागिरी
मुंबई उपनगर
रायगड
सिंधुदुर्ग
याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौकामालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.
हेही वाचा -
Cyclone Tauktae : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
Cyclone Tauktae : मुंबईसह या परिसरांना परिसराला सतर्कतेचा इशारा