Advertisement

पालिकेत ५० टक्के उपस्थिती सक्तीची

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील किमान 3 ते 4 दिवस कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे.

पालिकेत ५० टक्के उपस्थिती सक्तीची
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील किमान 3 ते 4 दिवस कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असणं पालिका प्रशासनाने बंधनकारक केलं आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तसं परिपत्रकच जारी केलं आहे. 

या परिपत्रकानुसार, हे आदेश धुडकावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लांब राहणारे कर्मचारी अडचणीत येणार आहेत.  पालिकेतील अनेक कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. सध्या लोकल ट्रेन बंद आहे. त्यामुळे कार्यालयात कसं पोहोचायचं, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. कार्यालयात जाता आले नाही आणि वेतन कापले तर घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थितीबाबत फेरविचार करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होऊ लागली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच राज्य सरकारने सर्व कंपन्यांना कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 5टक्क्य़ांवर आणली. मात्र पालिकेने आता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य विभागांमध्ये ५० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. सर्व खातेप्रमुखांना ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद सॅप प्रणालीत करण्याचे आदेश दिले आहेत.



हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा