Advertisement

मुंबईत कोरोनाचे ११०५ नवे रुग्ण, रविवारी ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू

रविवारी दिवसभरात ३९३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ११०५ नवे रुग्ण, रविवारी ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी पहिल्यांदा कोरोना रुग्णांनी ३२२ मृत्यूंचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोरोनाने राज्यात रविवारी २६० जणांचा बळी घेतला. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर  नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात ११०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-'कोरोना' टेस्ट से मत डरो ना..!

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९ रुग्ण दगावले आहेत. तर १ आँगस्ट रोजी ४५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३१ जुलै रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय रविवारी मुंबईत कोरोनाचे ११०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १६ हजार ४५१ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ३९३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ८८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी

राज्यात आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५०९ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २५ हजार २६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ९४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ९५०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०५ (४९), ठाणे- २१७ (२), ठाणे मनपा-२८२ (१४),नवी मुंबई मनपा-४०० (८), कल्याण डोंबिवली मनपा-४०२ (१२),उल्हासनगर मनपा-४६ (२), भिवंडी निजामपूर मनपा-१४ (३) , मीरा भाईंदर मनपा-१९५ (७),पालघर-११३ (४), वसई-विरार मनपा-२०८ (१५), रायगड-२४७ (५), पनवेल मनपा-१४७, नाशिक-१०९, नाशिक मनपा-२७३ (८), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१६९ (७),अहमदनगर मनपा-१३६, धुळे-६३ (१), धुळे मनपा-६३ (३), जळगाव-१३४, जळगाव मनपा-१०९ (२), नंदूरबार-१३, पुणे- ४८५ (११), पुणे मनपा-१७६२ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-७३४ (१५), सोलापूर-१५४(८), सोलापूर मनपा-३० (४), सातारा-२१५ (६), कोल्हापूर-११२ (२), कोल्हापूर मनपा-८५ (१), सांगली-१६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-३७ (४), सिंधुदूर्ग-२५, रत्नागिरी-९४, औरंगाबाद-४८ (२), औरंगाबाद मनपा-७४ (३), जालना-२८ (२), हिंगोली-१३ (२), परभणी-३, परभणी मनपा-१४ (१), लातूर-८३ (४), लातूर मनपा-५५ (७), उस्मानाबाद-८८ (२), बीड-८५, नांदेड-१२९, नांदेड मनपा-१२९ (१), अकोला-३ (३), अकोला मनपा-८ (२), अमरावती- १५ (२), अमरावती मनपा-७२ (१), यवतमाळ-६३ (१), बुलढाणा-४१ (१), वाशिम-३० (३), नागपूर-१०१ , नागपूर मनपा-१४४ (२), वर्धा-१८, भंडारा-५, गोंदिया-५, चंद्रपूर-२१, चंद्रपूर मनपा-६ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १२.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा