Advertisement

मुंबईत कोरोनाचे २ हजार ३८९ नवे रुग्ण, ४३ जणांचा दिवसभरात मृत्यू

गुरूवारी दिवसभरात ११७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३६ हजार ७३९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २ हजार ३८९ नवे रुग्ण, ४३ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ३९८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात २३८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४३ रुग्ण दगावले आहेत. तर १५ सप्टेंबर रोजी ४९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १६ सप्टेंबर रोजी एकूण ५० जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २३८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ७८ हजार २७५ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ११७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ३६ हजार ७३९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाःमहाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. आज २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या  ३ लाख १ हजार  ७५२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह ( २०.४४ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७ हजार ७४८  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९८  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २४,६१९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४११ (४३), ठाणे- ४७१ (७), ठाणे मनपा-४२३ (२), नवी  मुंबई मनपा-३१८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-६२५ (२), उल्हासनगर मनपा-६८ (१), भिवंडी निजामपूर मनपा-४८ (१), मीरा भाईंदर मनपा-२५० (७), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२९६ (४), रायगड-५२२ (७), पनवेल मनपा-३४६, नाशिक-४४४ (७), नाशिक मनपा-१४१५ (५), मालेगाव मनपा-५० (२), अहमदनगर-६२६ (१०),अहमदनगर मनपा-१३८२ (७), धुळे-१०४ (१), धुळे मनपा-९५(१), जळगाव-५०६ (१४), जळगाव मनपा-२९४ (११), नंदूरबार-१०६ (१), पुणे- १७१२ (१५), पुणे मनपा-२२६९ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००२ (१०), सोलापूर-५१४ (१०), सोलापूर मनपा-८२, सातारा-७७४ (१८), कोल्हापूर-४८७ (१९), कोल्हापूर मनपा-३०४ (२), सांगली-५५२ (२९), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४६० (१४), सिंधुदूर्ग-१०४ (१), रत्नागिरी-२४३ (२), औरंगाबाद-१५९ (३),औरंगाबाद मनपा-३२२ (५), जालना-१४७ (१), हिंगोली-४२, परभणी-५०, परभणी मनपा-२८ (६), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-११७ (३), उस्मानाबाद-२१४ (७), बीड-३१७ (९), नांदेड-२१३ (७), नांदेड मनपा-६६ (४), अकोला-४३, अकोला मनपा-१६, अमरावती-१५९ (१), अमरावती मनपा-२३२ (२), यवतमाळ-२६५ (२), बुलढाणा-१६६ (२), वाशिम-१६३, नागपूर-४०७ (४), नागपूर मनपा-१७६९ (३३), वर्धा-१०१ (१), भंडारा-३१० (२), गोंदिया-१७४ (१), चंद्रपूर-१३४, चंद्रपूर मनपा-२१२, गडचिरोली-६३, इतर राज्य- ३२ (२)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा