Advertisement

नि:क्षारीकरण प्रकल्प मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल- उद्धव ठाकरे

समुद्राच्या पाण्याचं नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल.

नि:क्षारीकरण प्रकल्प मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल- उद्धव ठाकरे
SHARES

मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प  सुरु करणे हे महत्त्वाचंच नाही, तर क्रांतीकारी पाऊल असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakeray) यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि.  यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचं पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते. परंतु त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचं पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना  किती धरणं बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचं वाळवंट करायचं याचा विचार करणं आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे. 

हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचं नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.  

हेही वाचा- केंद्राने लस दिल्यास महाराष्ट्रात २ महिन्यांत लसीकरण पूर्ण करू- नवाब मलिक

रिसायकल पाणी

अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पाहता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने (bmc) महत्त्वाचं पाऊल टाकल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. यामुळे बऱ्याच दिवसांची मागणी यातून पूर्ण होईल. एसटीपी प्रकल्पातील रिसाकल केलेलं पाणी बांधकाम क्षेत्रासह इतर बाबींसाठी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आणखी मजबूत करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले.

किनारपट्टी भागात प्रकल्प उभारावेत

राज्याच्या किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याचं नि:क्षारीकरण करण्याचे छोटछोटे प्रकल्प उभे करावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करून मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मालाड येथील २०० दशलक्ष लिटर च्या  नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या डीपीआर साठी होणारा सामंजस्य करार हे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. विष्यात  ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत याचा विस्तार करता येऊ शकेल.  

पाणी सुरक्षिततेमध्ये इस्त्राईलचं काम खूप मोठं आहे तसंच त्यांचं तंत्रज्ञानही जगविख्यात आहे. कृषी आणि पाण्याच्या क्षेत्रात त्यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प राज्यात आणि देशात सुरु आहेत. पावसाच्या पाण्याचं महत्त्व आपण सर्वजण जाणून आहेत, परंतू त्यातील अनिश्चितता, वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी पाहता पावसावर किती आणि कितीकाळ अवलंबून रहायचे याचा विचार करणे अगत्याचे ठरत असल्याने नि:क्षारीकरणासारख्या प्रकल्पाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवतं, असंही ते यावेळी म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा