Advertisement

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात

दिवसभरात ३ हजार ७५ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ४० जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर २.५७ एवढा झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, परिस्थितीही नियंत्रणात
SHARES

कोरोनाशी निकराची झुंज देत असलेल्या राज्याला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी राज्यात ७ हजार ३४५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १७ लाख ३० हजार ७१५ एवढी झाली आहे. त्यामुळे Recovery Rate ९३.२८ एवढा झालाय. दिवसभरात ४ हजार ७५७ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ४० जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर २.५७ एवढा झाला आहे.

हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ही १८ लाख ५२ हजार २६६ एवढी झालीय. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही ८० हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. फायझर (Pfizer) ने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) वापराला भारतात परवानगी मागितली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने याबाबतचा अर्ज भारतीय औषधी महानियंत्रक DCGI (डीसीजीआई) कडे केला आहे. मात्र हा अर्ज करताना कंपनीने जी अट घातली त्या अटीमुळे सर्व घोडं अडलं असून त्यामुळे फायझरच्या लशीला (Pfizer corona Vaccine) परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचाः- मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं

फायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. भारतात अर्ज करताना कंपनीनी एक अट घातली आहे. या औषधामुळे जर एखाद्या रुग्णावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. ती जबाबदारी सरकारे घ्यावी असं कंपनीने म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा