Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसूफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत नापास झालेल्या १५७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट :  इस्माईल युसूफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा
SHARES

बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांना नापास केल्याचं प्रकरण उघड झालं होतं. त्यानंतर त्या कॉलेजच्या आवारात काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला यश आलं असून राज्य मंडळाने नापास झालेल्या १५७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंबई लाइव्हने बातमी दिली होती.

 
काय आहे संपूर्ण प्रकरण ?

 इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेत ३११ विद्यार्थ्यांपैकी १५४ विद्यार्थी पास झाले असून ५७ विद्यार्थी नापास झाले होते. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण न दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानतंर या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे धाव घेत, याबाबत जाब विचारला होता. मात्र, सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आम्ही बोर्डाकडं जमा केली असं सांगत कॉलेजने या प्रकाराची दखल घेण्यास मनाई केली.

त्यानंतर संतप्त झ विद्यार्थ्यांनी ४ जूनला कॉलेजसमोर आंदोलन केले होतं. त्यात विद्यार्थी, त्यांचे पालक आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे काही कार्यकर्ते सहभागी झाली होते. त्याशिवाय नापास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने चुकीचे पाऊल उचल्यास याची संपूर्ण जबाबदार महाविद्यालय प्रशासनाची असेल. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन पुढील २ दिवसात हा प्रश्न सोडवावा, अन्यथा विद्यार्थी परिषद यासंबधी तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला होता.


विद्यार्थी मंत्रालयात 

या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता अभाविपच्या कार्यकर्ते व नापास झालेले विद्यार्थी यांनी मंत्रालयात धडक घेतली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर ही चूक कॉलेज प्रशासनाकडून झाली असून येत्या काही दिवसात या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येईल असा निर्णय बोर्डाद्वारे घेण्यात आला. बोर्डाच्या या फेरपरीक्षाबाबतचं पत्र २५ किंवा २६ जूनला काढण्यात येणार असून विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा दुसऱ्या कॉलेजमध्ये घेतली जाणार आहे.


विशेष म्हणजे बोर्डाच्या इतिहासात प्रथमच फेरपरीक्षा होत असून शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपण उभे राहिले. तसंच नुकतंच बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नसल्याने आम्ही बोर्डाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. तसंच याप्रकरणी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे.
  - अनिकेत ओव्हाळ, प्रदेशमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद



हेही वाचा -

ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा टेकगिग हॅकथॉनमध्ये विजय

बायफोकल प्रवेशाची पहिली यादी जाहीर



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा