Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं सर्वच सुविधा बंद करण्यात आल्या असून, येत्या काळात येणाऱ्या गणेशोत्सवारही कोरोनाचं संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवाचे १० दिवस मुंबई गजबजलेली असते. परंतु, यंदा कोरोनामुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केलं आहे. त्याचप्रमाणं आता नवी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र, केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे.

श्रीमूर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे.

मंडप/रोषणाई - मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.

आगमन - श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे.

श्री दर्शन - मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इ) हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे.

कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.

विसर्जन - आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी, जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.

राज्यात २२ ऑगस्टला गणेश उत्सव सुरू होत आहे. तोपर्यंत कोरोनाची राज्यात काय परिस्थिती असेल त्यावरही हा निर्णय अवलंबून असणार आहे.



हेही वाचा -

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवासेनेचं समर्थन

यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना प्राधान्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा