Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९१० नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू

गुरूवारी दिवसभरात ९८८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९२ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ९१० नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गुरूवारी कोरोने ३१६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ९१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान

 राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५७ रुग्ण दगावले आहेत. तर ४ आँगस्ट रोजी ५६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ आँगस्ट रोजी एकूण ४२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय गुरूवारी मुंबईत कोरोनाचे ९१० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख २० हजार १६५ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ९८८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९२ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-न्यायालयाने नाराजी व्यक्त करूनही 'तो' अधिकारी क्वारंटाईन, बिहार पोलिस महासंचालकांकडून नाराजी

राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६  हजार ३०५  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.

हेही वाचाः-पालघर आणि विरारमध्ये पावसाचा जोर वाढला

आज निदान झालेले ११,५१४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३१६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा