महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाची आता अँटिजन चाचणी केली जाईल. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यसाठी महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं परीपत्रक काढत या संदर्भात माहिती दिली.
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नवीन परिपत्रकात असं म्हटलं आहे की, TrueNat/CBNAAT सारख्या चाचण्या संक्रमणाची तपासणी करण्यासाठी केल्या जातील. जेणेकरून मृतदेह त्वरीत संबंधित कुटूंब किंवा लोकांच्या ताब्यात देता येणं शक्य होईल.
इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील बर्याच जिल्ह्यामधील शवविच्छेदन पूर्णपणे भरले आहेत. उदाहरणार्थ, पुण्याच्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दररोज ४० ते ५० मृत्यू होतात आणि कमीतकमी १५ इथं आणले जात आहेत. त्याचप्रमाणे, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी ३० ते ३५ रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर बाहेरून १० मृतदेह आणले जात आहेत. यामुळे मॉर्गेग पूर्ण भरले आहे.
यावर एका आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोरोना विषाणूच्या संसर्ग वाढीमुळे मृतांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचण्यांचा निकाल एका तासामध्ये समोर आल्यानं मृतदेह ताब्यात देणं सोपं होईल आणि हे काम झपाट्यानं करता येईल.
हेही वाचा : केडीएमसी करणार ४ लाख ७६ हजार घरांचं सर्वेक्षण
परीपत्रकात हे देखील नमूद केलं आहे की, संशयित कोरोना संक्रमितांच्या मृतदेहावर रुग्णालयात मेडिको कायदेशीर प्रकरणात लेबल लावले जाऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत तैनात असलेले डॉक्टर त्यावर लेबल लावून मृतदेह शवागारात पाठवून पोलिसांना कळवतील.
मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिस मृतदेहाचे मेडिको कायदेशीर शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करतील. मार्गदर्शक सूचनांमध्ये असं म्हटलं आहे की, अशा घटनांमध्ये मृतदेहाचे फॉरेन्सिक शवविच्छेदन केलं जाणार नाही.
कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटीजन चाचणी केली जाते. यात संशयित रूग्णाच्या नाकातून स्वॅब घेऊन त्याची चाचणी केली जाते. याचा निकाल एका तासापेक्षा कमी वेळेत येतो. निकाल सकारात्मक असल्यास, तो जवळजवळ १०० टक्के विश्वासार्ह मानला जाऊ शकतो. परंतु ३० ते ४० टक्के प्रकरणांमध्ये तो नकारात्मक देखील दर्शवू शकतो.
महाराष्ट्र हा देशातील सर्वात जास्त बाधित राज्य आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ३७४ लोकांना संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यापैकी २९ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारपर्यंत मुंबई, पुणे आणि ठाण्यात अनुक्रमे ८ हजार १०९, ४ हजार ७५४ आणि ४ हजार १३४ मृत्यू नोंदवले गेले. याखेरीज जळगाव, नाशिक आणि नागपूर अशी काही जिल्हे आहेत जिथे कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या १,००० ते १,००० च्या वर आहे.
हेही वाचा