निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण डाएट, हेल्दी फूड, जिम, योगा अशा सर्व गोष्टींना प्राधान्य देतो. पण जर आपण वेळेत जेवत नसू, तर ते तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतं. वेळेवर जेवत जा रे, असं घरातली वडीलधारी मंडळी सांगत असतातच. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कामाच्या व्यापातून आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला ते करणं शक्य होत नाही.
या सर्वांचा शरीरावर किती वाईट परिणाम होत असतो याची साधी कल्पनाही आपल्याला नसते. अनेक वेळा असं होतं की, सकाळी उशीरा उठणं होतं त्यामुळे सकाळचा नाष्टा दुपारी, दुपारचं जेवण दोन वाजता किंवा तीन वाजता होतं. त्यात संध्याकाळी काहीतरी अरबट चरबट खाल्ल जातं. एकूणच काय, तर खाण्या-पिण्याच्या सवयींचा बट्याबोळ झालेला असतो. त्यामुळे सकाळचा नाष्टा दहाच्या आत, दुपारचं जेवण एक वाजता आणि रात्रीचं जेवण सात वाजता करणं आवश्यकच आहे.
आयुर्वेदात रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घेणं चांगलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रात्रीचा काळ हा चार टप्प्यांमध्ये विभागला आहे. निसर्ग चक्र आणि शरीराची सायकल निसर्ग चक्राशी जुळणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जेवण घ्यावं, त्यामुळे आपली अनेक रोगांपासून सुटका होते. तुम्ही ऑफिसला असाल, वेळ मिळत नसेल तर भाजी-चपाती रोल करून नेता येईल. रात्री ऑफिसमध्ये लेट होणार असेल तर डबा घेऊन जाता येईल. शिवाय तुमच्या जेवणाच्या वेळा एकसमान असाव्यात. म्हणजे रोज साधारणपणे त्याच वेळी दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण व्हायला हवं.
हेही वाचा
वाईट सवयी सोडल्या नाहीत, तर हे वॉच देईल शॉक!