फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हे अॅप आता सगळ्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. काही जण आपल्या कामासाठी या अॅपचा वापर करत असतात, तर अनेक जण या अॅपवर आपला वेळ घालवत असतात. मात्र, आता हे अॅप बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय, येत्या काही दिवसांत कधीही फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्यानं फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. फक्त ‘कू’ या समाजमाध्यमी ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यात केंद्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. त्यांचा स्वीकार करण्यासाठी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी समाप्त झाली. मात्र, अद्याप वरील तीनही समाजमाध्यमांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार केलेला नाही.
त्यामुळे भारतीय (India) कायद्याचं पालन करण्यात असमर्थ ठरल्याप्रकरणी या सर्व समाजमाध्यमांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकार वापरू शकते. दरम्यान, फेसबुक आणि ट्विटर यांनी आम्ही केंद्राकडे सहा महिन्यांची मुदत मागितली असल्याचे स्पष्ट केलं आहे.
काय आहेत नवे नियम?
हेही वाचा -
राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण
लस खरेदीसाठीच्या बीएमसीच्या जागतिक निविदेला ८ कंपन्यांचा प्रतिसाद