Advertisement

ट्रेकिंग करताना 'ही' घ्या काळजी


ट्रेकिंग करताना 'ही' घ्या काळजी
SHARES

पावसाळा सुरू झाला की धबधब्याचं ठिकाण, नदी, एखादा किल्ला किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचे बेत नक्की होतात. अशा ठिकाणी अनेकदा अतिउत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना घडते. निसर्गाच्या सहवासात जाताना त्याच्या नियमांप्रमाणेच वागायचं हे लक्षात घ्यायला हवंकारण मजामस्ती यासोबतच तुम्हाला स्वत:ची काळजी घेणं देखील आवश्यक आहे.


अनेकदा पर्यटक धबधबा, गड-किल्ले इथं भटकंती करायला जातात. पण चुकीचं पाऊल उचल्यामुळं आपला जीव देखील गमावतात. कधी दारूच्या नशेत तर कधी सेल्फीच्या नादात, तर कधी एखादं धाडस दाखवण्याच्या वेडापायी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पर्यटकांनी हे  समजणं गरजेचं आहे की, ट्रेकिंग म्हणजे फक्त स्वानंद नाही. तर यात अनेक जणांचा सहभाग असल्यामुळे तिथे वर्तनाचंसुरक्षेचं सामाजिक भानही ठेवणं आवश्यक आहेत्यामुळे ट्रेकिंगला जाताना एखाद्या अनुभवी ट्रेकिंग ग्रृपसोबत जाणं योग्य ठरेलहल्ली अनेक अनुभवी ट्रेकिंग ग्रुप छोटे-मोठे ट्रेक आयोजित करत असतात.

सौजन्य

निसर्गरम्य स्थळी जेव्हा आपण जातो तेव्हा काळजी घेणं आवश्यक आहे. एखाद्या अनुभवी ग्रुपसोबत जाताना तुमच्यावर त्या ग्रुप लिडरचे बारीक लक्ष असते. पण नवखे तरूण जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा ते सुरक्षेच्या दृष्टीनं अजिबात विचार करत नाहीत. शिवाय अशा ठिकाणी जायचं म्हणजे तुमची मानसिक आणि शारिरीक तयारी लागते. डोंबिवलीतील काही तरूणांचा एक ग्रूप ट्रेकिंगसाठी गेला होता. पण ते रस्ता भटकले आणि जंगलात हरवले. आमच्या ट्रेकर्सच्या एका ग्रुपला त्यांचा कॉल आला. त्यानंतर त्यांना तिकडून रेस्क्यू करण्यात आलं. त्यामुळे गड-किल्ले अशा ठिकाणी जाताना नियम पाळले जाणं आवश्यक आहे

- तेजस लोखंडे, अध्यक्षस्वास्थ्यरंग गडभेट


काय काळजी घ्याल?

१) पावसाळी सहलीला निघण्यापूर्वी हे जाणून घ्यावं, की आपण कोणाबरोबर चाललोय. आपण ज्यांच्याबरोबर जातोय तो ग्रुप किंवा ती व्यक्ती पूर्वी कधी तिथे जाऊन आली आहे का? नसेल तर आधी जाऊन आलेल्या व्यक्तींकडून त्या ठिकाणाची थोडी माहिती गोळा करा.

२) तुम्ही ट्रेकिंगला ज्या ठिकाणी जात आहात तो किती दूर आहे? किंवा पायी त्या ठिकाणी पोहचण्यास किती वेळ लागतो? तिथं कसं जायचं? ट्रेकिंग पॉईंटपासून एखादं गाव किंवा पाडा किती अंतरावर आहे? तिथं वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का? जर असेल तर तिथला दूरध्वनी क्रमांक काय? गावातील सरपंचाचा फोन नंबर काय? याची माहिती घेणं आवश्यक आहे.

३) ट्रेकला निघण्यापूर्वी सर्व गोष्टींची एक चेकलिस्ट तयार करा. अमुक एका प्रवासाला जाण्यासाठी तुमच्या बॅकबॅगमध्ये नेमक्या किती आणि कोणत्या गोष्टींची गरज आहे, याची लिस्वट बनवा आणि त्यानुसार आवश्यक वस्तू बॅगेत न विसरता ठेवा. 


४) उघड्यानं किंवा बनियान, हाफपँट घालू नये. कारण पाऊलवाटेवरील वनस्पतीशी संपर्क आल्यास किंवा जंगली किडे चावल्यावर अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंगावर फुल टीशर्ट आणि फुलपँट असावी. पायात रबर सोल असलेले बूट असावेत.

५) हातात एक छोटी चार फुटांपर्यंत काठी ठेवा. एखादा साप जाताना दिसला तर त्याला काठीनं मारू नका. हातानं स्पर्श न करता काठीनं त्याला वाटेतून दूर करा. साप स्वत:हून जात असेल तर जाऊद्या. उगाच धाडस दाखवू नका. 

६) प्रथमोपचाराची बॅग जवळच ठेवा. त्यात आधार फळी आणि त्रिकोणी बँडेज जरूर ठेवा. फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीस बांधण्यास उपयोगी पडते. मांजरपाट कापडाचा दोन फुटाचा चौकोन घेऊन मधून तिरपा काप द्या. दोन त्रिकोणी बँडेज तयार होतील.

७) धबधब्याच्या ठिकाणी जिथे थेट वरून पाणी पडत असेल त्या ठिकाणापासून थोडे अंतर ठेवूनच बसावे.

८) धबधबा कोसळणाऱ्या ठिकाणी सतत पडणाऱ्या पाण्यामुळे कुंड तयार होते. त्याची खोली तुमच्या जवळील काठीनं, बांबूनं किंवा दोराला दगड बांधून मोजावी.

९) धो धो पाणी पडत असलेल्या ठिकाणी खाली बसू नका. कारण डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यातून धबधब्यात  तयार होतो. त्या वाहणाऱ्या पाण्यातून एखादं झाड किंवा फांदी पाण्यातून वाहात येणारा दगड उंचावरून तुमच्या डोक्यात कोसळण्याची शक्यता आहे.

१०) साप चावल्याची घटना घडली तर चावलेल्या जागेवरचे दाताचे व्रण पाहा. दाताचे व्रण सरळ रेषेत गोलाकार असतील तर बिनविषारी आणि दोनच दातांचे व्रण असतील तर साप विषारी असा अंदाज करता येतो. त्या व्यक्तीस लवकरात लवकर हॉस्पीटलमध्ये पोहोचवणे अवश्यक आहे.



११) लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.

१२) पोहता येत नसेल तर गुडघ्यापर्यंत पाणी असलेल्या खोलीपर्यंतच जावेकारण पाण्याची भिती वाटत असेल तर पटकन बाहेर पडता येईलकंबरेपर्यंत पाण्यात जाऊ नकापाण्याचा प्रवाह जोरदार असेल तर पाणी तुम्हाला खेचून नेईल.

१३) डोंगरावर असताना काळे ढग आले तर जास्तीत जास्त वेळ पाण्यात राहू नकाकारण डोंगरातील वरच्या भागात पाऊस पडला तर खालील भागात कुंडात किंवा नदीत पाण्याची पातळी आणि प्रवाह पटकन वाढू शकतो.

१४) सर्वात महत्त्वाचं निसर्गरम्य स्थळी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. दारू पिणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. असे अनेक अपघात झाल्याचं आपण बातम्यांमध्ये पाहतोच.

१५) मुळात निसर्गरम्य वातावरणात दारू पिणं हे चुकीचं आहे. अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी मद्यपान करून काचेच्या बाटल्या तिकडेच फेकून जातात. या काचांमुळे पर्यटकांना, गावकऱ्यांना आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना इजा होऊ शकते.



हेही वाचा-

'हे' आहेत मुंबईजवळचे जबरदस्त ट्रेकिंग पाॅईंट्स!

आता गुगल देणार भारतातील पूरस्थितीची माहिती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा