Advertisement

कोरोनानंतरचं आर्थिक संकट १-२ महिन्यांचं नाही, तर… शरद पवारांचा अंदाज काय सांगतो?

कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही (economy) जाणवू लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी १ किंवा २ महिन्यांचा कालावधी पुरेसा नाही, त्यासाठी जास्त काळ लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

कोरोनानंतरचं आर्थिक संकट १-२ महिन्यांचं नाही, तर… शरद पवारांचा अंदाज काय सांगतो?
SHARES

कोरोनाचं संकट (coronavirus) हे एक जागतिक संकट आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न हाेत आहेत. भारतातही सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पण कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही (economy) जाणवू लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी १ किंवा २ महिन्यांचा कालावधी पुरेसा नाही, त्यासाठी जास्त काळ लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) म्हणाले. फेसबुक लाइव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.


हेही वाचा- कोरोनाच्या संकटात राजकारण नको, वांद्र्यातील घटनेवर शरद पवारांचं भाष्य

भारतातील मृत्यू चिंताजनक

कोरोनाचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील? यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, लाॅकडाऊनचा (lockdown) कालावधी १४ एप्रिलला संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या सूचनांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. अमेरिका आणि इटलीत परिस्थिती भयावह आहे. युरोप, अमेरिकेशी भारताची तुलना करता येणार नाही. भारतात ३७७ लोक दगावले आहेत. देशात वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे.

उत्पादनाची साखळी ठप्प 

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचे (lockdown) परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. राज्यावरही काहीअंशी हे संकट घोंघावू लागलं आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग (business in trouble) बंद आहेत. शून्य उत्पादन, वाढणारं कर्ज आणि कामगारांची जबाबदारी अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. शेतकऱ्यांना शेतातला (farming) माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. उत्पादनाची साखळी ठप्प झाल्याने उद्योग आणि इतर क्षेत्रही आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे हे परिणाम एक ते वर्ष जाणवतील. त्यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहेत,’ असं भाकित शरद पवार यांनी केलं आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग काय? निलेश राणे यांचा सवाल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा