लोकसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे देशात पुन्हा मोदी लाट येणार का? तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत का? या प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय. बोल मुंबईच्या माध्यमातून मुंबई लाइव्हने थेट मतदारांना याविषयी प्रश्न विचारले आहेत.
मतदारांच्या मते २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेसारखी परिस्थिती यंदा नसली, तरी देशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल. अनेकांना राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी अजून बराच काळ वाट बघावी लागेल असं वाटतंय.
तर या दोघांव्यतीरिक्त देशात पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार कोण? या प्रश्नावर मात्र मतदारांनापुढे एकही आश्वासक चेहरा येत नाही नाही.
हेही पाहा-
इश्यू क्या है?: शिवसेना भाजपला मत मागण्याचा अधिकारचं द्यायला नको, काय म्हणाले निरूपम? बघा व्हिडिओ
बोल मुंबई: मागील ५ वर्षांत महागाई आणि भ्रष्टाचार कमी झालाय का? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडिओ