काँग्रेस सरकारच्या काळात वाढती महागाई आणि भ्रष्टाचार लक्षात घेत मतदारांनी २०१४ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींना बहुमतांने विजयी केलं. परंतु, बहुमतांनी निवडून आल्यानंतर भाजपा सरकारच्या काळात खरंच महागाई आणि भ्रष्टाचार कमी झाला का ? या मुद्द्यावर मुंबईकरांची मत काय आहेत हे जाणून घेतलंय मुंबई लाइव्हनं.
मुंबईकरांच म्हणणं आहे की, भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला आहे. परंतु, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जसं आगोदर होतं तसंच, आताही सुरू आहे. काहीच कमी झालं नाही. त्याशिवाय, महागाईमुळं सामन्य माणसांचे हाल होतंच राहणार, असं देखील काही मतदारांनी म्हटलं आहे. एका मतदारानं सांगितलं की, '२०१४च्या आधीही मी इथं राहत होतो. आताही तिथंच राहतो आहे. महागाईमध्ये कोणताही बदल झालेला नसून, ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हेही वाचा -
बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ
बोल मुंबई: देशात कुणाचं सरकार येणार? मुंबईकरांचं मत काय? बघा व्हिडीओ