महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा शासन निर्णय नुकताच महाविकास आघाडी सरकारने काढला. या निर्णयाकडे बघून हसावं की रडावं अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. कारण प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणारी ही थाळी जिल्हानिहाय जास्तीत १५०० तर कमीत कमी १५० लोकांनाच ही थाळी खाता येणार आहे.
शिवभोजन योजनेअंतर्गत १० रुपयांच्या थाळीची वर्गवारी राज्य सरकारने शासन निर्णय काढून जाहीर केली आहे. या वर्गवारीनुसार १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला दरदिवशी फक्त १८००० थाळ्याच मिळणार आहेत. या थाळ्यांनी नेमकी कुणाची भूक भागणार असा प्रश्न उपस्थि होत आहे.
हेही वाचा- पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार
शिवभोजन योजनेत थाळ्यांच्या संख्येप्रमाणे जेवणाच्या प्रमाणावरही बंधन घालण्यात आलं आहे. दुपारी १२ ते २ या वेळेतच ही शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे. या थाळीत फक्त २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी डाळ आणि भात मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावरील या याेजनेसाठी ३ महिन्यांसाठी ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.