Advertisement

पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. यानुसार, मृतांच्या वारशांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर इतर सर्व पूरग्रस्तांना रोख दहा हजार आणि पाच हजारांचे धान्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठक झाल्यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वडेट्टीवार यांनी सांगितलं की, प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल. असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा