Advertisement

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये १ एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथिल होणार

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट होत आहे.

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये १ एप्रिलपासून कोरोना निर्बंध शिथिल होणार
(File Image)
SHARES

महाराष्ट्र सरकार १ एप्रिलपासून कोविड-19 वरील सर्व निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट होत आहे. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. यासंदर्भात एक-दोन दिवसांत अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

सध्याचे निर्बंध उठवण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तथापि, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य-नियुक्त कोविड टास्क फोर्स आणि इतर अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाईल.

केंद्रानं जारी केलेल्या आदेशानुसार, लसीकरण आणि सोशल डिस्टनसिंग आवश्यक असेल. तसंच सार्वजनिक ठिकाणी फेस मास्कचा वापर सुरूच राहणार आहे.

दरम्यान, थिएटर, मॉल्समध्ये जाणाऱ्या लोकांसाठी लसीची आवश्यकता यांसारखे निर्बंध दूर करणार असल्याचंही समोर आलं आहे. प्रतिबंध हटवण्याचा अर्थ असा होईल की, सर्व क्रियाकलाप प्री-कोविड परिस्थितीप्रमाणेच होतील.

लसीकरण न केलेल्या नागरिकांवर सार्वजनिक वाहतूक किंवा विवाह, राजकीय आणि सामाजिक समारंभांना उपस्थित राहणासाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

मॉल्स आणि चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्यांना आणि कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणाऱ्यांसाठी राज्यानं सध्या दुहेरी डोस लसीकरण अनिवार्य केले आहेत.

शिवाय, महामारी रोग कायद्यांतर्गतही, राज्य सरकारला काही गोष्टींवर अंकुश लावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, या कायद्यांतर्गत, मास्क आणि लसींच्या वापरासाठी सक्ती केली जाईल. याशिवाय, या कायद्यांतर्गत औषधे आणि सॅनिटायझरच्या किमतीवरील मर्यादा कायम राहतील.

सध्याच्या परिपत्रकानुसार १४ जिल्ह्यांमध्ये सर्व शॉपिंग सेंटर्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिम आणि स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क १०० टक्के क्षमतेनं चालू शकतात. एका नवीन परिपत्रकामुळे उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये ही शिथिलता वाढवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात १०३ कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यात शून्य मृत्यू आहेत. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 78,73,722 वर पोहोचली आहे. मुंबईत ३६ प्रकरणे नोंदवली गेली आणि शून्य मृत्यू झाल्याची संख्या 1,056,993 झाली आहे, तर मृतांची संख्या 19,559 आहे.



हेही वाचा

गुड न्यूज! गुढीपाडव्याला मुंबई मेट्रो ७, २A'चे मुख्यमंत्री करणार उद्घाटन

महाराष्ट्र अंधारात जाण्याची भिती, वीज कर्मचारी संपावर ठाम

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा