Advertisement

आज बाळासाहेब हवे होते- राज ठाकरे

या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

आज बाळासाहेब हवे होते- राज ठाकरे
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत असताना या क्षणी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. (mns chief raj thackeray memorize late bal thackeray on ram mandir bhoomipujan)

आपल्या फेसबुक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे, शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच या क्षणाचं महत्व वेगळं आहे.

हेही वाचा- Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्नधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. 

अर्थात या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.

सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल याची मला खात्री आहे. तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.

असं राज ठाकरे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद होत असला, तरी सद्याच्या स्थितीत भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही, असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा