कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने अद्यापही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, बससेवा सुरू असल्याने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी, कोविड संदर्भातील कोणत्याच नियमांचे बसच्या प्रवासात होताना दिसत नाही. बसमध्ये प्रचंड गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे.
रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल pic.twitter.com/B0R09IjW22
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020
बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नोकरदारांना प्रवास करता यावा याकरता रेल्वे आणि मेट्रो सेवा वगळता सर्व सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यात आल्या आहेत.
तोच धागा पकडून देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात प्रवासी एकमेकांना खेटून उभे राहिलेले दिसतात. बसच्या दरवाजावरही लोक उभे असलेले दिसतात. बस वाहकही हतबल झालेले यातून दिसत आहे. ‘बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.
बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वे च्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का?? pic.twitter.com/IJlWDwsTLa
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020
हेही वाचा