Advertisement

गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटल्यावर तुमचा तीळपापडा का झाला?

अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा प्रश्न शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी भातखळकर यांना विचारला आहे.

गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटल्यावर तुमचा तीळपापडा का झाला?
SHARES

गुजराती माणसाने उद्धव ठाकरे (uddhav thackerayयांना ‘आपडा’ म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसतं खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा प्रश्न शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी भातखळकर यांना विचारला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती भाषिकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने शिवसेना येत्या १० जानेवारी रोजी गुजराती मतदारांसाठी मेळावा घेणार आहे. या मेळाव्यासाठी 'मुंबई मां जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा', अशी टॅगलाईन ठरवण्यात आली आहे. त्यावर खोचक शब्दांत टीका करताना, 'शिवसेनेनं साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनाशी पक्कं ठरवलं आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, जनाबसेनेला आपटा', असं ट्विट भाजपचे (bjp) आमदार अतुल भातखळकर यांनी केलं होतं.

त्यावर हेमराज शहा यांनी भातखळकर यांच्या टीकेचा समाचार घेताना म्हटलं, गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. ९२-९३ साली झालेल्या दंगली दरम्यान शिवसेनेने गुजराती बांधवाना खरी मदत केली, त्यांना संरक्षण दिलं. 'मी मुंबईकर' साद घालत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व भाषिकांना आपलंसं केलं. याउलट भाजपने गुजराती बांधवांना फक्त मतदानापुरतं वापरलं आणि नंतर वाऱ्यावर सोडून दिलं. 

हेही वाचा- “तर उद्या शिवसेना मुस्लिमांचाही मेळावा घेईल”

गुजराती मतदार सोडा, मराठी मतदार पण शिवसेनेला (shiv sena) मतदान करणार नाही, अशा बाता भातखळकर मारत होते. प्रत्यक्षात तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे, बाबरी यांनी पाडली नाही, राममंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसलं? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारत आहे, देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवलं होतं हे तुम्ही विसरलात त्याची फळं आज भलतंच कोणी चाखत आहे, भाजपचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासं झालं आहे, असा दावा देखील शहा यांनी केला.

गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपनं त्याला स्वतःची जागीर समजू नये. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गुजराती बांधवांना 'आपडा' वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे, त्यात तुम्हाला जळफळाट होण्याचं कारण नाही. ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्ही नंतर खोटी आश्वासन देऊन फसवता, मुंबईत तुम्हाला फक्त लोढा हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको. म्हणून भाजपवर गुजराती समाज नाराज आहे. येत्या निवडणुकीत गुजराती समाज भाजपला दणका दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखाील हेमराज शहा यांनी भाजपला दिला आहे.

(shiv sena leader hemraj shah criticised bjp mla atul bhatkhalkar over gujarati seminar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा