मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. हे जयंत परब याला पाहून नक्कीच पटते. अवघ्या १६ व्या वर्षी या मुलाने घरी संगणक तयार केलाय आणि तो सुद्धा इ-कचऱ्याचा वापर करून.
वाढत जाणाऱ्या इ-कचऱ्याचा धोका लक्षात घेऊन जयंतने इ-कचऱ्यापासून संगणक तयार करण्याचा निर्णय घेतला.
नववी नापास झाल्यानंतर जयंत निराश झाला नाही तर त्याने इ-कचऱ्यापासून संगणक तयार केला. हा संगणक तयार करायला २ हजार ५०० ते ३ हजार खर्च येतो आणि जयंत ५ हजार ५०० हजाराला तो संगणक विकतो.
गरीब मुलांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, या उद्देशाने हा संगणक तयार केल्याचं जयंतने सांगितले.