रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी 4जी चा नवीन फीचर मोबाईल लाँच केला. मुंबईत झालेल्या रिलायन्स कंपनीच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी हा जिओ मोबाईल मोफत असल्याची घोषणा देखील केली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिज शेअर्सच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेल आणि आयडिया यांच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या अॅन्युअल जनरल मीटिंग अर्थात एजीएमने रिलायन्स समूहाचे एमडी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या नव्या फीचर मोबाईलची घोषणा केली.
#RILat40
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017
Today, I am delighted to announce that JioPhone will be available to all Indians for an effective price of – Rs 0: Mukesh Ambani
या फोनची किंमत 1000 ते 1500 पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला डिपॉझिट म्हणून तुम्हाला 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण हा फोन 3 वर्ष वापरल्यानंतर परत दिल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. त्यामुळे एका अर्थी मोबाईल फुकटच म्हणावा लागेल!
रिलायन्स जिओच्या ट्विटर अकाऊंटवर मुकेश अंबानी यांचं एजीएममधलं भाषण लाइव्ह दाखवण्यात आलं..
Reliance AGM 2017 https://t.co/QhY07IPN8e
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017
हेही वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)