भायखळा - गेल्या अनेक दिवसांपासून मेघराज सेठी परिसरातला कचरा न उचलल्याने कचऱ्याचा ढीग साचला आहे. इथे राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. सध्या पावसाळामुळे साथीचे रोग बळावले आहेत. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.