Advertisement

लॉकडाऊननंतर इंडिगोकडून विमानात जेवण बंद

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. संपूर्ण विमान वाहतूक बंद असल्याने विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

लॉकडाऊननंतर इंडिगोकडून विमानात जेवण बंद
SHARES

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. संपूर्ण विमान वाहतूक बंद असल्याने विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे काही विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात केली आहे. आता विमान कंपनी इंडिगोनेही एक निर्णय घेतला आहे. देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर आणि विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर इंडिगोकडून आपल्या प्रवाशांना विमानात कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाही. त्याचबरोबर विमानसेवाही एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सुरू करण्यात येईल, असं इंडिगोने सांगितलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून २१ दिवस लॉकडाऊन असणार आहे. १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. पण कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाऊ शकतो किंवा टप्याटप्याने वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन उठविला जाऊ शकतो. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्सने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आहे. त्यामध्ये कंपनी सध्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देत आहे आणि नजीकच्या काळात काय महत्त्वाचे आहे याची माहिती देण्यात आली आहे.

या मेलमध्ये दत्ता यांनी म्हटलं आहे की, विमानसेवा पुन्हा सुरू झाली की कशा पद्धतीने कामकाज सुरू करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण विमानाच्या अंतर्गत स्वच्छतेकडे अजून जास्त लक्ष देण्यात येईल. विमान सातत्याने निर्जंतूक करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर विमानात प्रवाशांना कोणतेही अन्नपदार्थ दिले जाणार नाहीत. अर्थात हा निर्णय अल्प काळासाठीच असेल. विमानातील एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेऊनच विमानसेवा चालविली जाईल. या संदर्भात आणखी नियम घेऊन लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत येऊ, असेही त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा