‘म्हणून’ पालघर हत्याकांडातील आरोपींना जामीन मिळाला

या आरोपींविरोधात पोलिसांना ९० दिवसात पुरावे सादर करणे गरजेचे होते. मात्र पोलिस आरोपींविरोधात पुरावे दाखवण्यात अयशस्वी ठरल्याने डहाणू येथील स्थानिक न्यायालयाने या आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.

‘म्हणून’ पालघर हत्याकांडातील आरोपींना जामीन मिळाला
SHARES

पालघर येथील दोन साधूंच्या झुंजबळप्रकरणातील २८ आरोपींविरूद्ध ९० दिवसांच्या निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील  पहिल्या दोन एफआयआरमध्ये या २८ जणांची नावे होती त्यातील १८ जणांची नावे तिसऱ्या आरोपपत्रात  असल्याने त्यांना पून्हा ताब्या घेण्यात आलं होतं.या प्रकरणात एकूण १५४ जणांना पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचाः- ‘त्या’ हजार कोटी ड्रग्जच्या तस्करीमागे दिल्ली कनेक्शन

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले होते. पोलिसांनी  या प्रकरणात एकूण १५४ आरोपींना अटक केली होती. यामध्ये ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

हेही वाचाः- माझं नाव गद्दारांच्या यादीत नाही, गुलाबराव पाटलांनी राणे पितापुत्रांना सुनावलं

या प्रकरणात पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवलेले होते. त्यातील पहिल्या गुन्ह्यातील २८ आरोपींचा समावेश दुसऱ्या गुन्ह्यांतही दाखवण्यात आला होता. तर तिसऱ्या आरोपपत्रातही त्यातील १८ जणांचा समावेश दाखवण्यात आला आहे. या आरोपींविरोधात पोलिसांना ९० दिवसात पुरावे सादर करणे गरजेचे होते. मात्र पोलिस आरोपींविरोधात पुरावे दाखवण्यात अयशस्वी ठरल्याने डहाणू येथील स्थानिक न्यायालयाने या आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.

आरोपींना झाली होती कोरोनाची लागण

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या ११ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. आरोपींना वाडा पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे. आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.गडचिंचले गावातील २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. यापैकी ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी ६ आरोपींचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत. त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. एका आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. आणखी ११ आरोपांना करोनाची लागण झाल्याने वाडा शहरात सगळेच हादरले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा