सध्या सर्व ठिकाणी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गेले कित्येक महिने लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांच्या घरी किंवा मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. अशाच मुंबईतील काही निवडक गणपती मंडळाचा इतिहास, फोटो, वैशिष्ट्यांची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी.
चलचित्राच्या माध्यमातून विविध आख्यायिका सादर करणाऱ्या वांद्रे पश्चिमेकडील 'वांद्र्याचा राजा गणेशोत्सव मंडळा'ने यंदा दुर्वासूराची कथा सांगणारं चलचित्र साकारलं आहे. या चलचित्रातून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय का आहेत? याबाबतची अख्यायिका सांगितली जात आहे. मंडळाला यंदा ९५ वर्षे पूर्ण होत अाहेत. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
'असं' मिळालं नाव
१९२४ साली विभागातील काही वरिष्ठ मंडळानी सामाजिक प्रबोधन व मराठी संस्कृती जपण्यासाठी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली होती. सुरूवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. वांद्रे परिसरात नव्वदी पार करणार हे एकमेव मंडळ असल्याने भाविकांनी या गणपतीला 'वांद्र्याचा राजा' हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती वांद्र्याचा राजा या नावानं प्रसिद्ध झाला.
मंडळाची वैशिष्ट्ये
वांद्र्याचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, चश्मा वाटप यांसह विविध सामाजिक उपक्रम वर्षानुवर्षे राबवत आहे. त्यातही महत्त्वाचं म्हणजे मागील ९५ वर्षांपासून मंडळ सातत्याने चलचित्र साकारत आहे. यांत तिरुपती बालाजी, मदर तेरेसा, विठ्ठलरूपी गणपती, शिर्डी साईबाबाच्या रूपातील गणपती आणि त्यांच्या अख्यायिका सांगणाऱ्या चलचित्रांचा समावेश आहे.
वांद्रे पश्चिमेकडील परिसर मुस्लिमबहुल असला, तरी हिंदू-मुस्लिम भाविक भक्तीभावाने एकत्रितपणे या गणपतीची पूजा करतात. तरूण पिढीला एकोप्याने राहण्याचं महत्त्व समजावून सांगतात.
सध्या सर्व ठिकाणी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गेले कित्येक महिने लाडक्या बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांच्या घरी किंवा मंडळात बाप्पा विराजमान झाला आहे. अशाच मुंबईतील काही निवडक गणपती मंडळाचा इतिहास, फोटो, वैशिष्ट्यांची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी.
चलचित्राच्या माध्यमातून विविध आख्यायिका सादर करणाऱ्या वांद्रे पश्चिमेकडील 'वांद्र्याचा राजा गणेशोत्सव मंडळा'ने यंदा दुर्वासूराची कथा सांगणारं चलचित्र साकारलं आहे. या चलचित्रातून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय का आहेत? याबाबतची अख्यायिका सांगितली जात आहे. मंडळाला यंदा ९५ वर्षे पूर्ण होत अाहेत. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
'असं' मिळालं नाव
१९२४ साली विभागातील काही वरिष्ठ मंडळानी सामाजिक प्रबोधन व मराठी संस्कृती जपण्यासाठी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली होती. सुरूवातीला या गणपतीला केवळ 'सार्वजनिक गणपती' या नावानं ओळखलं जात होतं. वांद्रे परिसरात नव्वदी पार करणार हे एकमेव मंडळ असल्याने भाविकांनी या गणपतीला 'वांद्र्याचा राजा' हे नाव दिलं. तेव्हापासून हा गणपती वांद्र्याचा राजा या नावानं प्रसिद्ध झाला.
मंडळाची वैशिष्ट्ये
वांद्र्याचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी, चश्मा वाटप यांसह विविध सामाजिक उपक्रम वर्षानुवर्षे राबवत आहे. त्यातही महत्त्वाचं म्हणजे मागील ९५ वर्षांपासून मंडळ सातत्याने चलचित्र साकारत आहे. यांत तिरुपती बालाजी, मदर तेरेसा, विठ्ठलरूपी गणपती, शिर्डी साईबाबाच्या रूपातील गणपती आणि त्यांच्या अख्यायिका सांगणाऱ्या चलचित्रांचा समावेश आहे.
वांद्रे पश्चिमेकडील परिसर मुस्लिमबहुल असला, तरी हिंदू-मुस्लिम भाविक भक्तीभावाने एकत्रितपणे या गणपतीची पूजा करतात. तरूण पिढीला एकोप्याने राहण्याचं महत्त्व समजावून सांगतात.