Advertisement

coronavirus : महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट, यंदाची वारी रद्द

कोरोनाचं (Coronavirus) विघ्न आल्यानं यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

coronavirus : महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट, यंदाची वारी रद्द
SHARES

महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेला पंढरपुरातील (Pandharpur) चैत्र वारी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचं (Coronavirus) विघ्न आल्यानं यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackaray) यांनी जनतेशी संवाद साधताना या संदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या (covid - 19) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी चैत्र वारी अखेर रद्द करण्यात आली आहे. दिनांक ४ एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी असते. मंदिर समितीनं दिनांक १७ मार्च ते ३१ मार्च अखेर श्री विठ्ठल -रुक्‍मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र यंदा देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. अशावेळी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी एका ठिकाणी जमा न होणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन सांगितलं आहे. अशावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं आवश्यक आहे. पुढील काही दिवस या नियमांचं पालन करणं गरजेचं असून सर्व सण-उत्सव घरच्या घरी साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

यंदा गुढीपाडवाही नागरिकांनी घरच्या घरीच साजरा केला. त्यानुसार राज्यातील सर्व सोहळे घरात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या अराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या चैत्र वारी रद्द केल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा