महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या सत्तेविषयी सोशल मीडियाद्वारे अनेक जण आपलं मत मांडत आहेत. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीच्या पतीनं देखील महाराष्ट्रच्या सत्ता स्थापनेबद्दल आपलं मत मांडलं आहे. पण ज्याप्रकारे त्यांनी ट्वीट केलं आहे त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आलेत.
I have a feeling he will start changing names of cities etc. Will take stupid decisions to intensify Maratha pride etc.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 27, 2019
Will Bhaiyas like me be safe in the rule of Goonda Party? https://t.co/oiu8VfxROu
पल्लवी जोशी यांचा पती, बॉलिवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीनं ट्विट करत म्हटलंय की, ‘मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरांची नावं बदण्यास सुरुवात करतील. मराठी माणूस आणि यांसारख्या विषयांवर मूर्खासारखे निर्णय घेण्यात येतील. आता माझ्यासारखे भय्या गुंडा पार्टीत सुरक्षित राहतील का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एका चॅनलचा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केल्याचं दिसतंय.
सध्या सोशल मीडियावर त्याच्या ट्वीटची जोरदार चर्चा आहे. ट्वीटरवर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काहींनी जोरदार विरोध केला आहे.
— Praveen Gavit (@praveengavit10) November 27, 2019
जिथून आलात तिथे गेलात तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही.. कारण बाकी भरपूर महत्वाचे प्रश्न आहेत ते सरकारने सोडवावे अशी आमची अपेक्षा आहे. ☺️☺️
— किरण... (@Coolkiranj) November 27, 2019
Same "goonda party" was in power since 2014, were you unsafe in Mumbai for last 5 years?
— Ranvijai (@Ranvijai1) November 27, 2019
महाराष्ट्रात राहून लोकांनी निवडेलेल्या नेते आणि पक्षांना गुंड म्हणता? येवढंच असुरक्षित वाटतयं तर आलाय तिकडं परत जायला काही हरकत नाही
— Sharad patil (@SharadPatil01) November 27, 2019
१. इथे बरेच प्रश्न आहेत, सरकारचे प्राधान्य ते सोडवायला असेल.
— प्रथमेश शिरवडकर (@prathameshs1189) November 27, 2019
२. मुलं ऑक्सिजनशिवाय तडफडत असताना असले रिकामचोट उद्योग करायला योगी बसलाय. त्याला सल्ले द्या.
३. तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर जिथून आलात तिथे चालते व्हा. महाराष्ट्रावर उपकार करायला तुम्ही आला नव्हता...
अरे स्वतः च्या पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात येता तुम्ही. तुमची राज्य तुमच्या नेत्यांमुळे आणि तुमच्या जातीवादी राजकारणामुळे भिकेला लागली. त्यात महाराष्ट्रातील पक्षाचा काय दोष?
— प्रशांत स्मिता नाईक | #मराठी (@PrashantNaik_in) November 28, 2019
आम्ही काय निमंत्रण घेऊन आलो नव्हतो.
सरळ चालते व्हा इकडून. आणि तुमच्या माणसांना पण घेऊन जा !
जावई आहात घरजावई नाही.
— ऋषिकेश सि.चव्हाण (@RishiKesch) November 28, 2019
जावयाने सासरी जास्त दिवस राहू नये.
विवेक अग्निहोत्री सोशल मीडिया नेहमीच सक्रिय असतात.
वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर ते आपलं मत मांडतात. नुकताच त्यांचा ‘द ताशकंत फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विवेकनं त्यांच्या करिअरची सुरुवात ‘चॉकलेट’ चित्रपटानं केली.
या व्यतिरिक्त त्यानं ‘धन धना धन गोल’ आणि ‘हेट स्टोरी’ चित्रपटांची निर्माती केली आहे.
हेही वाचा