Advertisement

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

लाॅकडाऊनमध्ये केलेली शिथिलता जीवघेणी ठरू शकते असं वाटलं तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला.

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा
SHARES

पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊन अंतर्गत महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत अर्थचक्र पूर्वपदावर आणण्यासाठी काही प्रमाणात सवलती देऊ केल्या आहे. त्यानुसार सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते असं वाटलं तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार १० जून २०२० रोजी विधानभवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून हे वक्तव्य केलं. 

आरोग्य खराब करू नका

महाराष्ट्रात लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. त्यानुसार राज्य सरकारने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथितला देऊ केली आहे. परंतु लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी धाकधूक वाटली. सरकारने आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी ५ पासून संध्याकाळी ७ पर्यंत मैदानं किंवा इतर ठिकाणी आपण फिरायला जाण्याची, व्यायाम करायला परवानगी दिलेली आहे, आरोग्य खराब करायला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी

सरकार अतिशय सावधपणे पावलं टाकत आहे. जसं आपण लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने लागू केलं, त्याचप्रमाणे लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणताना टप्प्याटप्प्याने सगळं पूर्वपदावर आणावं लागेल. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही, अजूनही हा लढा संपलेला नाही. पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही. त्यामुळेच ही काही प्रमाणात शिथिलता आपण दिलेली आहे.

हेही वाचा - केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे

गर्दी टाळा

सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. जर वाटलं की ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचं ऐकत आहे. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे,ते आपल्या हिताचं आहे. मी जनतेला गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहे.

कोरोनाचा धोका 

लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. 

मात्र सरकारने लाॅकडाऊन शिथिल करताच रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी होताना दिसू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. बेस्ट बसमध्ये पूर्वीइतकीच रेटारेटी सुरू आहे. बहुतेक जण खासगी वाहनांनी आपापल्या कार्यालय, व्यवसायाकडे जात असल्याने रस्त्यावरही वाहतूककोंडी होऊ लागली आहे. अशा स्थितीत कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, संसर्गाचा धोका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा