Advertisement

वीज कशामुळे गेली? मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वीज कशामुळे गेली? मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश
SHARES

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितले.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणेकरून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.

हेही वाचा - तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असंही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितलं. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असे निर्देश त्यांनी दिले.

ग्रीड फेल्युअर झाल्यामुळं मुंबईतीळ वीजपुरवठा सोमवारी सकाळी खंडित झाला होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबई लोकलसह सर्वच यंत्रणांना त्याचा फटका बसला. मात्र, जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळानंतर मुंबईतील वीजपुरवठा पुन्हा सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे.  वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.
सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. 

हेही वाचा - मुंबई लोकल पुन्हा रुळावर; प्रवाशांना मोठा दिलासा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा