Advertisement

आरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी

मेट्रो ३ (metro 3) प्रकल्पाच्या ​आरे कारशेडच्या ​​​ (aarey car shed) कामावर आणलेली स्थगिती (stay) त्वरीत उठवून कारशेडचं काम सुरू करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
SHARES

राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार मेट्रो ३ (metro 3) प्रकल्पाच्या आरे कारशेडच्या  (aarey car shed) कामावर आणलेली स्थगिती (stay) त्वरीत उठवून कारशेडचं काम सुरू करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.  

मेट्रो ३ चं (metro 3) आरे कारशेड (aarey car shed) शहरातील इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने (committee report) नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे सोपवला आहे. 

हेही वाचा- आरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे

अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक (manoj saunik) यांनी या समितीचा अहवाल (committee report) मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे. आरे सोडून कांजूरमार्ग (kanjur marg) किंवा इतर ठिकाणी मेट्रो ३ चं कारशेड (metro 3 car shed) हलवल्यास सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा बोजा पडणार आहे. वाढणारा खर्च, प्रकल्पाला होणारा उशीर आणि इतर अडथळे टाळण्यासाठी मेट्रो ३ चं कारशेड आरेमध्येच व्हावं शिवाय कारशेडच्या कामावर लावण्यात आलेली स्थगिती हटवण्याची शिफारसही समितीने केली आहे. या अहवालामुळे राज्य सरकारवर टीका करण्याची आयती संधी भाजपला मिळाली आहे.

त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, आरे कारशेडसाठी (aarey carshed) पर्यायी जागा शोधण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजलं. त्यानुसार मेट्रो ३ (metro 3) कारशेडचं काम आरेतील आहे त्याच ठिकाणी सुरू करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवून ताबडतोब हे काम सुरू करावं. या कामावर स्थगिती आणल्याने राज्य सरकारचं दररोज ५ कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलून काम सुरू करावं, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.

हेही वाचा- कारशेड आरेतच व्हावं, समितीच्या शिफारशीने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (environment minister aaditya thackeray) यावर म्हणाले, समितीने सोपवलेला हा अहवाल (committee report) मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात (cmo) पोहोचला आहे. हा अहवाल अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेला नाही. या अहवालाचा योग्य रितीने अभ्यास करूनच कारशेडबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. पर्यावरणाची हानी न करता राज्याचा विकास करणे हेच ठाकरे सरकारचं धोरण असून आतापर्यंत सरकारने घेतलेले सर्व निर्णय याच पद्धतीने घेतलेले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पदभार स्वीकारताच सर्वात पहिल्यांदा आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये ४ सदस्यीय समिती स्थापन केली होती.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा