Advertisement

गुड न्यूज ! मुंबईला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं

गेल्या वर्षी जुलै २६ रोजी हा तलाव भरला होता. मात्र यंदा हा तलाव भरण्यासाठी आँगस्टचा तिसरा आठवडा उजाडावा लागला.

गुड न्यूज ! मुंबईला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावानंतर ‘मोडकसागर तलाव’ आता ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी मोडकसागर हा तलाव आहे. तलाव परिसरात पडत असलेल्या पावसामुळे हा तलाव मंगळवारी रात्री ९.२४ वा च्या सुमारांस ओसांडून वाहू लागले. गेल्या वर्षी हा तलाव २६ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाला होता. काही दिवसांपूर्वीत तुळशी तलावातील पाणी ओव्हरफ्लो झाले होते.

हेही वाचाः- मध्य रेल्वेची मेन, हार्बर वाहतूक ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आली एनडीआरएफ

मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा मोडकसागर हा तलाव मंगळवारी ओव्हर फ्लो झाला. शहापूर तालुक्यात असलेला मोडकसागर तलावात सकाळी १ लाख २७ हजार ९२५ दशलक्ष पाणीसाठी साठा उपलब्ध होता. या तलावाची क्षमचा १ लाख २८ हजार ९२५ इतकी आहे. तलाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे हा तलाव मंगळवारी मध्यरात्री ओसंडून वाहू लागला. गेल्या वर्षी जुलै २६ रोजी हा तलाव भरला होता. मात्र यंदा हा तलाव भरण्यासाठी आँगस्टचा तिसरा आठवडा उजाडावा लागला. विशेष म्हणजे मोडकसागर  तलाव भरल्यानंतर  मध्यवैतरणातील पाणीसाठाही वाढू लागतो. ही दोन्ही धरण वैतरणा या नदीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा हे धरण देखील याच नदीवर आहे. काही दिवसांपूर्वी बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव भरला. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी एक विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याआधी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव आणि विहार तलाव भरला होता. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर पाण्याची क्षमता असणारा हा तलाव मागच्यावर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

कुठल्या धरणात किती दशलक्ष लिटर पाणी

अप्पर वैतरणा – १५३६५६

मोडक सागर -१२७४१०

तानसा- १२९३९३

मध्य वैतरणा – १७३४१८

भातसा – ५८१०२१

विहार - २७६९७


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा