भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी NIA ने तिघांना केली अटक

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, कंबीर कलामंचा तर्फे विश्राम बाग पी.एस. पुणे येथील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यता आले होते. या कार्यक्रमात आरोपींना प्रशोभक केलेल्या भाषणांमुळे दंगल परिस्थिती घडण्यास कारणीभूत झाली.

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी NIA ने तिघांना केली अटक
SHARES

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एनआयएने सागर तात्याराम गोरखे, रमेश मुरलीधर गच्छोड आणि ज्योति जगताप यांना अटक केली आहे. या तिघांवर भडकाऊ भाषणे व हिंसाचार भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दलित आणि मराठा समाजाच्या विरोधातील लढाईच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे वर्षाच्या पहिल्या दिवशी हिंसाचार झाला.

हेही वाचा:-मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

कबीर कला मंचचे हे तिनही आरोपी बंदी घातलेली दहशतवादी संघटना सीपीआय (माओवादी) संघटनेच्या नेत्यांच्या संपर्कात होते.  . सागर तात्याराम गोरखे, रमेश मुरलीधर गच्छोड  आणि ज्योति राघोबा जगताप या तिघांना सोमवारी अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना आज मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी चार दिवस एनआयएच्या ताब्यात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे एजन्सीने सांगितले. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, कंबीर कलामंचा तर्फे  विश्राम बाग पी.एस. पुणे येथील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यता आले होते. या कार्यक्रमात आरोपींना प्रशोभक केलेल्या भाषणांमुळे दंगल परिस्थिती घडण्यास कारणीभूत झाली. या सर्व घटनेमागे सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे वरिष्ठ नेत्यांच्या हे आरोपी संपर्कात होते. या घटनेनंतर महाराष्ट्रात मोठी दंगल घडली. त्यात राज्यसरकारचे प्रचंड नुकसान झाले. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तुषार दामगुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जानेवारी २०२० मध्ये या प्रकरणात एनआयएने काँ गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, हय्याबाबू मुसलीविरतिल तराईल यांना अटक केली.

हेही वाचा:-तीन दिवसांच्या चौकशीनंतर अखेर रिया चक्रवर्तीला अटक

या तिघांच्या चौकशीत सागर, रमेश आणि ज्योती हे नक्षल आणि माओवादी संघटनेचा प्रचार करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ते सरकारने बंदी घातलेल्या संगटनेच्या नेत्यांच्याही संपर्कात होते. तसेच हे तिघेही फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे याच्याही संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जंगलात त्यांनी (कबीर कला मंच) सदस्यांच्या भेटीदरम्यान माओवाद्यांच्या चळवळीशी संबंधित विविध विषयांवर शस्त्रे आणि स्फोटक प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम घेतल्याचे पुढे केले आहे. तसेच पुण्यातील एल्गार परिषदेती सर्व आखणी मिलिंद तेलुंबडे यांनीच केल्याचे एनआयच्या चौकशीत निदर्शानास आले आहे. या तिघांना एनआयएने त्यांच्या विशेष कोर्टात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा